राष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

भारताच्या कठोर निर्णयांनी आतंकवाद्यांचा सुपडा साफ होणार ?

या निर्णयांमुळे पाकिस्तानवर व्यापक परिणाम होणार आहेत. सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आपल्या सिंचित क्षेत्राच्या सुमारे 80 टक्के भागासाठी सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती उद्ध्वस्त होऊन अन्नसंकट आणि वीजटंचाई निर्माण होऊ शकते. तुर्बेला, मंगला आणि चष्मा यांसारखी प्रमुख धरणे या नद्यांवर असल्याने वीज निर्मितीवर देखील मोठा परिणाम होईल. यामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Read More »
राष्ट्रीय

पहलगाम दहशतवादी हल्ला: कसा झाला हल्ला

निष्पापांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या या अमानुष कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काश्मीरमधील शांतता आणि पर्यटनाचे चित्र पुन्हा एकदा धूसर झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कृत्यांना कठोर आणि योग्य तो प्रतिउत्तर द्यावे, अशी संपूर्ण भारतीयांची ठाम मागणी आहे.

Read More »
अर्थकारण

जागतिक व्यापार युद्ध: भारतीय शेअर बाजारावर त्याचे दुष्परिणाम

भारतीय शेअर बाजारात ७ एप्रिल, सोमवार रोजी एक मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३,९०० अंकांनी खाली गेला, तर निफ्टी १०० अंकांनी घसरून २१,७५० च्या पातळीवर पोहोचला. या घटनेमुळे निफ्टीने गेल्या १० महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर पोहोचल्याची नोंद झाली. या अचानक झालेल्या घसरणीमुळे बाजारात एक प्रकारची घबराट पसरली, आणि BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले. हे बाजारातील एकूण मूल्याच्या बाबतीत ४ जून २०२४ नंतरची सर्वात मोठी घसरण ठरली.

Read More »
राष्ट्रीय

‘औरंगजेबपूर’ झालं ‘शिवाजी नगर’, उत्तराखंडमधील १५ ठिकाणांची नावं बदलली

उत्तराखंड राज्यातील सत्ताधारी पुष्कर सिंह धामी सरकारने एक महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. सरकारने जाहीर केले की, राज्यात एकूण १५ ठिकाणांची नावं बदलण्यात येतील, ज्यात हरिद्वार, देहरादून, नैनीताल आणि उधम सिंह नगर या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. सोमवारी ही घोषणा करण्यात आली, आणि सरकारने या निर्णयामागील कारणं स्पष्ट केली आहेत— भारतीय संस्कृतीचा सन्मान, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि लोकभावनांचा आदर.

Read More »
Uncategorized

काय आहे Ghibli स्टुडिओ ट्रेंड ?

सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) या अ‍ॅनिमेटेड फोटोंचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. अनेक जण ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि एक्सवरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीने स्वतःचे फोटो घिबली शैलीत रूपांतरित करून शेअर करत आहेत. हा ट्रेंड सामान्य लोकांबरोबरच सेलिब्रिटी आणि राजकारण्यांमध्येही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. पण घिबली अ‍ॅनिमेशन म्हणजे नेमकं काय आहे

Read More »
राष्ट्रीय

भारतीय रेल्वे 1,200 किमी/तास गतीने धावणार ?

हे प्रणाली १,२०० किमी/तासाच्या गतीने प्रवास करण्याची क्षमता प्रदान करू शकते, जे पारंपरिक रेल्वे किंवा व्यावसायिक विमानांपेक्षा खूप वेगवान आहे. उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबई (सुमारे १,५०० किमी) चे प्रवास फक्त ९० मिनिटांत पूर्ण होऊ शकते, तर दिल्ली ते जयपूर (सुमारे ३०० किमी) ची यात्रा केवळ ३० मिनिटांत पूर्ण होऊ शकते.

Read More »
राजकीय

पंजाबमध्ये ‘आप’ सरकारचा नवा घोळ – २० महिने मंत्र्याचा विभागच अस्तित्वात नव्हता!!

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्याने त्याचा थेट प्रभाव पंजाबच्या राजकारणावर दिसू लागला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दिल्लीच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच, ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब सरकारमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जात आहे. यामुळे पंजाबच्या राजकीय वातावरणात तणाव वाढला असून, आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More »
राष्ट्रीय

दिल्ली चे सरकार “लाडकी बहीण” चालवणार !

रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सुचनेनुसार करण्यात आली आहे. आरएसएसने महिला मुख्यमंत्रीच्या प्रस्तावाची शिफारस केली होती, आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने त्यास मान्यता दिली. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Read More »
राष्ट्रीय

व्हायरल क्लिपने निर्माण केला वाद

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया ने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात समर रैनाच्या संकल्पनेवर अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केली, ज्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि आसाममध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे आयोजक, रणवीर, अपूर्वा मखीजा आणि समर रैनाविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून यावर चौकशी सुरू आहे.

Read More »
राष्ट्रीय

दिल्लीत आम आदमी पार्टीला “आम आदमी” कडून मोठा धक्का !

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी मतदान झाले. भाजपने ४८ जागांवर विजय मिळवत आप (आम आदमी पार्टी) चा सूर गळला. सलग दोन वेळा सत्तेत असणाऱ्या आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. यापेक्षा धक्कादायक म्हणजे आप चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस आणि इतर पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही, हे आश्चर्यकारक आहे.

Read More »
Scroll to Top