राजकीय

राजीनामा? पण मी केलं तरी काय? – कृषिमंत्र्यांचा सवाल

“मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. आणि जर चौकशीत मी दोषी आढळलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना न भेटता थेट राज्यपालांकडे राजीनामा सादर करीन,” अशी ठाम भूमिका कोकाटे यांनी मांडली. “माझ्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

Read More »
आंतरराष्ट्रीय

भारताच्या कठोर निर्णयांनी आतंकवाद्यांचा सुपडा साफ होणार ?

या निर्णयांमुळे पाकिस्तानवर व्यापक परिणाम होणार आहेत. सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आपल्या सिंचित क्षेत्राच्या सुमारे 80 टक्के भागासाठी सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती उद्ध्वस्त होऊन अन्नसंकट आणि वीजटंचाई निर्माण होऊ शकते. तुर्बेला, मंगला आणि चष्मा यांसारखी प्रमुख धरणे या नद्यांवर असल्याने वीज निर्मितीवर देखील मोठा परिणाम होईल. यामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Read More »
राष्ट्रीय

पहलगाम दहशतवादी हल्ला: कसा झाला हल्ला

निष्पापांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या या अमानुष कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काश्मीरमधील शांतता आणि पर्यटनाचे चित्र पुन्हा एकदा धूसर झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कृत्यांना कठोर आणि योग्य तो प्रतिउत्तर द्यावे, अशी संपूर्ण भारतीयांची ठाम मागणी आहे.

Read More »
महाराष्ट्र

काँग्रेस ला मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर ?

संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश म्हणजे केवळ एका नेत्याचे पक्षांतर नाही, तर पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या अस्तित्वासाठी गंभीर आव्हान आहे. भोरसारखा पारंपरिक काँग्रेस गड जर भाजपच्या खात्यात गेला, तर या जिल्ह्यात राजकीय समीकरणं पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. पुढील काळात थोपटे यांचा राजकीय प्रवास काय वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read More »
अर्थकारण

जागतिक व्यापार युद्ध: भारतीय शेअर बाजारावर त्याचे दुष्परिणाम

भारतीय शेअर बाजारात ७ एप्रिल, सोमवार रोजी एक मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३,९०० अंकांनी खाली गेला, तर निफ्टी १०० अंकांनी घसरून २१,७५० च्या पातळीवर पोहोचला. या घटनेमुळे निफ्टीने गेल्या १० महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर पोहोचल्याची नोंद झाली. या अचानक झालेल्या घसरणीमुळे बाजारात एक प्रकारची घबराट पसरली, आणि BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले. हे बाजारातील एकूण मूल्याच्या बाबतीत ४ जून २०२४ नंतरची सर्वात मोठी घसरण ठरली.

Read More »
राष्ट्रीय

‘औरंगजेबपूर’ झालं ‘शिवाजी नगर’, उत्तराखंडमधील १५ ठिकाणांची नावं बदलली

उत्तराखंड राज्यातील सत्ताधारी पुष्कर सिंह धामी सरकारने एक महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. सरकारने जाहीर केले की, राज्यात एकूण १५ ठिकाणांची नावं बदलण्यात येतील, ज्यात हरिद्वार, देहरादून, नैनीताल आणि उधम सिंह नगर या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. सोमवारी ही घोषणा करण्यात आली, आणि सरकारने या निर्णयामागील कारणं स्पष्ट केली आहेत— भारतीय संस्कृतीचा सन्मान, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि लोकभावनांचा आदर.

Read More »
Uncategorized

काय आहे Ghibli स्टुडिओ ट्रेंड ?

सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) या अ‍ॅनिमेटेड फोटोंचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. अनेक जण ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि एक्सवरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीने स्वतःचे फोटो घिबली शैलीत रूपांतरित करून शेअर करत आहेत. हा ट्रेंड सामान्य लोकांबरोबरच सेलिब्रिटी आणि राजकारण्यांमध्येही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. पण घिबली अ‍ॅनिमेशन म्हणजे नेमकं काय आहे

Read More »
महाराष्ट्र

गुडीपाडव्याच महत्व काय आहे रे दादा ?

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी आणि चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा होतो. गुढी पाडवा फक्त एक नवा वर्षाच्या आरंभाचा सण नसून, त्याच्या ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि कृषी महत्त्वामुळे त्याचे स्थान अधिक प्रगल्भ आहे.

Read More »
महाराष्ट्र

थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी…! दोन्ही शिवसेना आमने सामने ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे विनोदी कलाकार कुणाल कामरा अडचणीत आले आहेत. मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »
आंतरराष्ट्रीय

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर येण्यास आणखीन विलंब ?

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर हे गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. या दोघांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू-10 मोहिमेची योजना तयार केली गेली होती, ज्यात या दोघांच्या जागी 4 नवीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवले जाणार होते. तथापि, तांत्रिक बिघाडामुळे क्रू-10 मोहिमेचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले आहे.

Read More »
Scroll to Top