
राष्ट्रीय
‘औरंगजेबपूर’ झालं ‘शिवाजी नगर’, उत्तराखंडमधील १५ ठिकाणांची नावं बदलली
उत्तराखंड राज्यातील सत्ताधारी पुष्कर सिंह धामी सरकारने एक महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. सरकारने जाहीर केले की, राज्यात एकूण १५ ठिकाणांची नावं बदलण्यात येतील, ज्यात हरिद्वार, देहरादून, नैनीताल आणि उधम सिंह नगर या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. सोमवारी ही घोषणा करण्यात आली, आणि सरकारने या निर्णयामागील कारणं स्पष्ट केली आहेत— भारतीय संस्कृतीचा सन्मान, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि लोकभावनांचा आदर.