गिरीश बापट यांचे राजकीय जीवन: संघर्ष आणि विजय…

गिरीश बापट यांनी सर्व कार्यकर्ते, विरोधक, आणि मतदार यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगात त्यांची काळजी घेऊन एक विशेष नातं तयार केले…

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली, आणि त्यांच्या दीर्घ आजाराशी चाललेल्या संघर्षाला अपयश आले. बापट यांच्या जाण्याने पुणे शहरातील भाजपचा एक मजबूत आणि एकनिष्ठ नेता गेला, हे दुःख भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्ययात्रेत सांगितले. सर्व जातीधर्मांच्या लोकांनीही त्यांचा नेता गमावल्याबद्दल दुःख व्यक्त केले, आणि सामान्य जनतेमध्ये अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, आणि उद्धव ठाकरे यांसारख्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. गिरीश बापट यांचे राजकारणाबाहेरील मैत्रीपूर्ण संबंध सर्वपक्षीय नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी होते, त्यामुळे त्यांच्या विरोधकांनाही आपल्या मित्राचा अपघात झाल्याने दुःख झाले, आणि त्यांच्या प्रतिक्रियाही तुम्ही मीडिया मधून पाहिल्या असतील.

गिरीश बापट यांचा जीवनप्रवास :

गिरीश बापट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यतेपासून पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार बनण्याचा प्रवास केला. त्यांनी १५ वर्षे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले, आणि भाजपची सत्ता नसतानाही स्थायी समिती अध्यक्षपद मिळवले. कसबा विधानसभा मतदारसंघात १९९५ ते २०१४ दरम्यान सलग पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले, आणि २५ वर्षे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०१४ मध्ये भाजपा-शिवसेना महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले, ज्यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गिरीश बापट यांच्या विरोधात रोहित टिळक यांना उमेदवारी दिली, आणि राहुल गांधी यांची सभा देखील झाली. तरीही, येथील मतदारांनी गिरीश बापट यांचा विश्वास ठेवला, आणि त्यांनी त्या निवडणुकीत विजय मिळवला. गिरीश बापट यांच्यामुळे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपची मजबूत पकड होती, कारण ते प्रत्येक जाती, धर्म, आणि सामाजिक स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचले. त्यांना मतदारांची वैयक्तिक विचारपूस करण्याची खूप आवड होती. त्यांना आजारी असताना देखील, दवाखान्यात अॅडमिट असताना, त्यांनी तिथल्या स्टाफची विचारपूस केली, हे स्टाफने मीडिया सोबत सांगितले.

गिरीश बापट यांनी सर्व कार्यकर्ते, विरोधक, आणि मतदार यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगात त्यांची काळजी घेऊन एक विशेष नातं तयार केले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे ते स्थानिक नागरिकांमध्ये एक अनोखा विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झाले.

विरोधकांनाही अश्रू अनावर :

पुण्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनी जवळून अनुभवला आहे. राष्ट्रवादीचे अंकुश काकडे आणि गिरीश बापट यांच्यातील राजकीय संबंध आणि विरोधही सर्वांसाठी परिचित आहे. पण गिरीश बापट यांनी राजकारणाच्या सीमेत राहून सर्व विरोधकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. पूर्वी महाराष्ट्राने विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंढे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अनुभवले होते, तद्वारेच गिरीश बापट यांचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी वैयक्तिक संबंध होते.

त्यांच्या जाण्यामुळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि माजी महापौर अंकुश काकडे यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर झाले. जर सध्याचे राजकारणी लोक विरोधकांना संपवण्याऐवजी असे आदर्श घेतात, तर महाराष्ट्र शांततेने नांदेल. स्व. गिरीश बापट, स्व. गोपीनाथ मुंढे, स्व. विलासराव देशमुख, आणि स्व. आर. आर. पाटील यांसारख्या राजकीय नेत्यांना हे खरे आदरांजली ठरेल.

गिरीश बापट यांची पोकळी भरून काढणारा नेता मिळणे कठीणच……. :

गिरीश बापट यांचे पुणे शहर आणि पुणे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी मोठे योगदान होते. त्यांनी पक्षासाठी आवश्यक ते सर्व करण्याची ताकद दाखवली, ज्याचा अनुभव सर्वांनी वेळोवेळी घेतला. फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत, त्यांच्या प्रकृती खालावलेली असताना देखील, त्यांनी व्हीलचेअरवर बसून आणि ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन प्रचारसभेत भाग घेतला, ज्याने त्यांच्या पक्षनिष्ठेचा परिचय दिला.

गिरीश बापट यांनी सर्व नागरिकांना समान वागणूक देत त्यांचा सन्मान केला. पुण्यापासून दिल्लीपर्यंत त्यांच्या आजुबाजूला नेहमीच नागरिकांची गर्दी असायची. त्यांच्या दैनंदिन कामांच्या यादीची डायरी नेहमीच त्यांच्या जवळ असायची. नागरिकांच्या कामांचा पाठपुरावा करून, त्यांनी काम पूर्ण झाल्यावर “तुम्ही मला सांगितलेलं काम झालं आहे” असे सांगत मदत केली. त्यामुळे असे मानले जाते की गिरीश बापट प्रचाराला न जाताही निवडून येत होते.

आमच्या टीमच्या वतीने स्व. खा. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top